#दि. २८/५/२०१७ च्या पत्रलेखिका सामंत यांच्या पत्राच्या अनुषंगाने स्फुरलेले विचार. मंगला ताई सामंत या नावा वरून ब्राह्मण वाटतात. तसेच असेल तर माझ्या सारख्या अस्पृशातील एक असा मी व समस्त अस्पृश्य वर्गास त्यांनी मांडलेले विचार काहीसे दिलासादायक आहेत. नजीकच्याच भूतकालीन पाश्च्यात्य प्रवाशांनी नोंदवून ठेवलेल्या मतांप्रमाणे सर्वच भारतिय ढोंगी व अप्रामाणिक आहेत या समजुतीस ते छेद देणारे देखील आहेत. अद्याप हि काही प्रामाणिकता व माणुसकी रा. स्व. संघाच्या ऐतिहासिक सिद्ध विकृत पेशवाईची पुनर्स्थापना करण्याच्या धेय्याने पछाडलेल्या ब्रह्मवृंदास वगळता, अन्य ब्राह्मणात शिल्लक आहे हे सामन्तां सारख्या एका ब्राह्मण भगिनी मुळे जाणवल्या नंतर, आद्य शंकराचार्योत्तर काळा पासून ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या आगमना पर्यंत, सर्वरीत्या नागवल्या व पिडल्या गेलेल्या अस्पृश्य व आदिवासी समूहात, अस्पृश्य नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या अवतीर्ण होण्या नंतर प्रगती सह जी विद्रोहाची हि लाट उसळली, व फक्त ब्राह्मणांनीच बोथट संवेदनाशील व कट्टर असहिष्णू अशा बनविलेल्या ब्राह्मणेत्तर बहुसंख्यांकांच्या बेताल वर्तनावर एक अक्सीर इलाज म्हणूनच, बाह्य शक्तींनी सहज उपलब्ध करून दिलेल्या अशा सशस्त्र साम्यवादि नक्षलवादाच्या रूपाने त्या वंचितांच्या नैसर्गिकताः उपद्रवी बनलेल्या मानसिकतेने जी ठळकपणे दिसून आली, तीस काहीसा आवर घालण्यास निश्चितच मोलाची मदत होणार आहे. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, नामदार गोखले, सावरकर, साने गुरुजी इत्यादिंसह, बाबासाहेब आंबेडकरां आधीच ब्राह्मण मनु रचित मनुस्मृती जाळण्यास पुढाकार घेणाऱ्या खऱ्या वंदनीय ब्राह्मणांची परंपराच खंडित झाली आहे कि काय असे वाटणाऱ्या या रा.स्व.संघ संचालित विकृत पर्वात, ब्राह्मणातीलच एक अशा सामंत ताईंचे विचार अस्पृशांना वाळवंटातील ओयासिस सारखे आहेत. त्यांनी कुंडलकरांची जी हजेरी घेतली आहे, त्याने त्यांच्या सारख्या गेंड्याच्या कातडीच्या व गत काही हजार काळा पासून स्वल्प संख्यांक असूनही, त्यांच्या पेक्षा शंभर पटीने जास्त असलेल्या इत्तद्देसीयांवर, आत्ता ब्राह्मण आणि भारतीय सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेहि हिंदु हा धर्म नसून ब्राह्मणांनी स्वसमुहाची लादलेली निव्वळ एक संस्कृती अथवा जीवन रहाटी आहे, असे आत्ता आत्ता उघड केलेल्या आणि जाहीर रित्या स्वीकारलेल्या गुपिता प्रमाणे, त्या हिंदू संस्कृती अंतर्गत ब्राह्मणांनी संशोधित करून रुजविलेल्या व फक्त भारतातच अस्तित्वात असलेल्या मानव जातीतील विकृत अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांवर काही हि परिणाम होणार नाहीत. असे असताना ब्राह्मणांच्याच आदेशानुसार आपल्या नव विवाहित बायकोला सुद्धा दक्षणा म्हणून ब्राह्मणास अर्पण करणारे, असे सिद्ध झालेल्या ब्राह्मणेत्तर उच्च वर्णीय इत्तदेसीयांवर त्याचा काही परीणाम होणे हि हिजड्याला बाळ होण्यासारखी अश्यक्यप्राय गोष्ट आहे. तिथेच सर्व भारतीयांच्या सर्वकष एकते चे अजूनही प्रकटीकरण न होण्याचे रहस्य दडलेले आहे. स्वल्प संख्यांक व लोकमान्य टिळकांनी संशोधनांती जाहीर केलेल्या अशा परदेशी ब्राह्मणांनी शिक्षणाच्या अधिकारा पासून ज्यांच्या राजांना देखील वंचित ठेवले होते, असे उच्चवर्णीय इत्तद्देसी, जे अस्पृश्यांवर निष्ठुर अत्याचार करताना सहजतेने तरस प्राण्याचे अनुकरण करतात पण इत्तर वेळी पंढरीच्या वारकऱ्यांच्या भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या चेहऱ्यांचेच प्रदर्शन मांडतात, ते सुद्धा जर सर्व भारतीयांतील एकमेव नवअन्वेषक व नव स्वीकारक अशा ब्राह्मण समुहा सारखे स्वतःत असे प्रगती दर्शक विचार अन्वेषित करणे जमत नसेल तर कमीतकमी ते स्वीकारण्याचे जरी बदल स्वतःत घडवून आणतील तर तो दिवस भारतिय सर्वार्थाने संघटीत व समर्थ होण्यासाठी सुदिन असेल. अन्यथा हजारो वर्षांपासून ते अस्पृश्यांना कमी लेखणे व छळणे इ. सारख्या घृणास्पद अमानवी व नटणे, सजणे आणि चालणे, बोलणे, विवाह, बर्थ डे अशा इतर सर्व छोट्या गोष्टींतच ब्राह्मणांचे निष्ठापूर्वक अनुकरण करीत आले आहेत. त्यांचे स्वतःचे असे म्हणण्यासाठी त्यांनी काही राखलेच नाही. हजारो वर्षांच्या स्वताः साठीच आरक्षित ठेवलेल्या शिक्षित बनणे, इत्तद्देसियांचे व्याख्यान, आख्यान, प्रवचन, कीर्तन यांच्या सततच्या भडीमाराने समुपदेशन करणे व सर्व देवांच्या मध्यस्थांच्या पदांच्या अधिकारांमुळे व तसे अधिकार ब्राह्मणां शिवाय इत्तर कोणाचेही असूच शकत नाहीत असे स्वतःच्या मेंदूवर स्वखुशीने बिंबवून अथवा गोंदवून घेण्याची मानसिकता पिढ्यानपिढ्या रुजलेल्या सर्व भारतीयांत फक्त ब्राह्मणच ठळक असे काहीसे स्वैर पण गैर हि आत्मविश्वासी दिसतात. भारतीयांवर ते म्हणतील ती पूर्व दिशा या तोऱ्यात ते काहीही खोट नाट रेटून लादू शकतात हे त्यांना त्यांच्या पद प्रक्षालनाच्या आरोग्यास हानीकारक अशा द्रावास देखील भक्तिभावाने तीर्थ म्हणून पिण्यासाठी झुंबड उडविणाऱ्या भारतीयांच्या मनोवृत्ती वरून चांगलेच ठावूक झाले आहे. त्याच स्वाभाविकतःच प्राप्त आत्मविश्वासाच्या जोरावर ब्राह्मणांतील दोन वर्षाच्या लेकरास देखील ते जर्जर म्हाताऱ्या कोताऱ्या सहित जमलेल्या सर्व गैर ब्राह्मणांचे समुपदेशन अथवा कीर्तन करण्या साठी उभे करू धजवतात. महदआश्चर्याची बाब म्हणजे अशा कीर्तना साठी जमलेले सारे लहानथोर भाविक त्या दोन वर्षांच्या ब्राह्मणी पोरट्याचे बाळबोध उपदेश देखील शिरोधार्य मानतात व त्या प्रमाणे व्यवहार देखील करतात. हजारो वर्षांपासून देवांची दलाली अशी दक्षणा व भाविकांनी देवांसमोरील दान पेट्यांत टाकलेल्या पैशांच्या राशीच्या जीवावर ब्राह्मण दाखवीत नसले आर्थिक विवंचना मुक्त आहेत. गत ५००० वर्षांपासून स्वतःच्या घरच्या चुली साठी लाकडे फोडणे सारख्या कुठल्याही कष्टाच्या कामासाठी देखील त्यांच्यासाठी जाती प्रथे अंतर्गत श्रेणीबद्ध व मोफतच्या कष्टकऱ्यांची मुबलकता असल्याने, केवळ स्वउत्पन्नाचे साधन म्हणूनच स्वकल्पित व निर्मित अशा देवांचा, इतद्देसीयांवरील पगडा अबाध अखंड राहावा, म्हणून त्यांचे महात्म्य वाढविण्याचा व स्व विरंगुळ्याचा देखील भाग म्हणून देवांपुढे सादर करायच्या, अशा कीर्तन प्रवचन व नर्तन आणि आरक्षित शिक्षण आदींची साधना करण्या साठी ब्राह्मणांकडे फावल्या वेळेची कमतरता नसायची. त्या साधनांच्या ५००० वर्षांच्या अखंड सरावा मुळे शब्दसंपदा, शब्द फेकिचे टायमिंग, आख्यान, व्याख्यान, गायन व प्रवचन आणि कीर्तनांतर्गत करावयाचा अभिनय आदि प्रदर्शनीय कलांत ब्राह्मण पारंगत व बहुसंख्येने असणे ह्यात काही हि नवल नाही. ती पारंगतता हा त्यांच्या अभिमानाचा विषय होवूच शकत नाही. ५००० वर्षां सारख्या प्रदीर्घ काळात एखाद्या माकडाचे देखील ब्राह्मणांना मिळत होत्या अशा सोयी सुविधा व अधिपत्य देण्या सारखे लाड पुरविले असते तर आत्तापर्यंत तो हि उत्क्रांत होवून कुठल्याही क्षेत्रात निष्णात मानल्या जाणाऱ्या कुठल्याही ब्राह्मणाच्या तोडीचा निश्चितच झाला असता. संत ज्ञानेश्वराने तर रेड्या सारख्या माकडा पेक्षा कैकपटीने बिनडोक अशा प्राण्याच्या तोंडून हि वेद म्हणवून घेवून तो बिनडोक रेडा हि वेदशास्त्र पारंगत ब्राह्मणाच्या तोडीचा असतो असे कधीच सिद्ध केले होते. कमाल व नवल तर ब्रिटीश राजवटीतच साक्षर होण्याची संधी मिळताच ब्राह्मणांच्या ५००० वर्षांपासून चालत आलेल्या कपट नाटकाचे आकलन होवून त्यांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिलेले महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे या गैर अस्पृश्यांचे व अस्पृशांतील एक अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. वाईट याचे वाटते कि ब्राह्मणांनी ज्यांना त्यांचे पायालाच स्पर्श करण्या इतपत स्पृश्य ठरवून स्व अन्वेषित व प्रस्थापित केलेल्या जातीव्यवस्थेत त्यांच्या खालोखाल दुय्यम व तिसरे स्थान दिले होते, ते देखील ब्राह्मणांच्या बरोबरीचेच लाभ घेण्याचे अधिकारी बनविले असतानाहि शिवाजी महाराज, महात्मा फुले, महर्षी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांच्या नंतर स्व समूहातून त्या महापुरुषांची बरोबरी करू शकेल असा एक हि निस्वार्थी व लोकहितवादी नेता निर्माण करू शकले नाहीत. अशावेळी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ज्या ब्राह्मणांचे पाय धुतलेले पाणी देखील हे इतद्देसी उच्चवर्णीय तीर्थ म्हणून पिण्यात अद्यापही धन्यता मानतात ते ब्राह्मणच त्या इतद्देसी उच्चवर्णीयांनी घृणित मानलेल्या अशा अस्पृश्यांतील बाबासाहेब आंबेडकरांना वंदनीय मानतात. कुंडलकरांसारख्या ब्राह्मणी पुरुष वृत्तीचे कान एका ब्राह्मण स्त्रीने टोचावेत याहून मोठा शाब्दिक हल्ला ५००० वर्षांपासून अनैतिक पद्धतीने सर्वस्वी वंचित, घृणित आणि कंगाल ठेवलेल्या अस्पृश्यांच्या राखीव जागांची गेली ५००० वर्षांपासून लायकी नसताना हि अनैतिक रित्या वर्ण वर्चस्वाच्या राखीव लाभांतार्गत, सर्व जमिनींसहित सर्व साधन सामुग्री आणि संपत्तीची लुट मार करून गब्बर होवून बसलेल्या ब्राह्मणांसहित इत्तरहि असूया करणाऱ्या सर्वांवर झाला नसेल. बरे झाले सोनारानेच कान टोचले. सतीची प्रथा बंद करणारे राजा राममोहन राय, रानडे, आगरकर, गोखलें, सावरकर व सानेगुरुजिं सारखे ब्राह्मण व छत्रपती शाहूमहाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे, गाडगेबाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरां सारख्या ब्राह्मणेत्तरांच्या, स्त्रीया, वंचित आणि पतितांच्या उद्धारांच्या व सर्वकष सुधारणांच्या दिलेल्या योगदानास अशी कृतज्ञतेची पावती एका ब्राह्मण स्त्री कडून मिळते, हे कृतज्ञतेची भावना संपूर्णपणे लोप पावली आहे कि काय असे वाटणाऱ्या सांप्रतच्या काळात खरोखर अभिनंदनीय आहे. वैषम्य याचेच वाटते कि अद्यापही कोणी ब्राह्मण पुरुष मंगला ताई सामंतां सारखे पुढे का येत नाही? तशी आवश्यकता भासण्याचे कारण कि ब्राह्मण स्त्रियां पेक्षा सर्व ब्राह्मणेत्तर भारतीयांवर ब्राह्मण पुरुषांचेच, ज्यांना भटजी असे अतीव आदरार्थी संबोधले जाते, त्यांचाच भक्कम पगडा आहे. भटजी म्हणतील तेच योग्य अशी त्यांची हजारो वर्षांपासूनची पिढ्यानपिढ्या करून दिलेली व राखलेली धारणा आहे. अशा भटजींचे पाय धुतलेले पाणी हि ते अद्यापपावेतो पवित्र तीर्थ म्हणून पीत आहेत हे बीजेपी अध्यक्ष अमित शहा सारखा तालेवार माणूस हि जेव्हा ब्राह्मण शंकराचार्याचे पाय भक्तिभावाने धुताना दिसतो तेव्हा खरे मानण्यास काहीही हरकत नसावी. ब्राह्मणांनी ब्राह्मण स्त्रियांना आत्ता आहे तशी मोकळीकच कधी दिली नव्हती. एक तर त्या अभागीणींना सतीच्या चीत्तेवर चढविले जायचे किंवा बोडक्याने वाड्याचा एखादा अंधारा कोपरा पकडावा लागायचा. हे असे कडवे वास्तव मांडण्याचे कारण एवढेच कि ब्राह्मण अस्पृशांवरील कुठल्याही अत्याचारात प्रत्यक्षात कधीही सहभागी नसले तरी अस्पृश्यांवरील सर्व अत्याचारां मागे कुंडलकरां सारख्या ब्राह्मण भटजिंनि हेतुतः प्रसवलेल्या अशा विचारांचीच अप्रत्यक्ष फूस असते. संपादक महोदय जशी सर्वच मोठ्या साखळी वृत्तपत्रांची मालकी जातीय उच्चवर्णीयांच्या भूमिकेच्या जामानिम्याचा सुप्त मोह असलेल्यांकडेच असते, तसेच संपादकां सहित बहुतांशी कर्मचारी बुद्धीची मशागत करण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या पदाचे लाभधारक आणि म्हणूनच पिढ्यानपिढ्या बैठ्या कामाचीच सवय असणाऱ्यां मधीलच असतात असे सार्वत्रिक निरीक्षणानुसार माझे मत झाले आहे. सबब हे पत्र छापण्याचे औदार्य म्हणण्या पेक्षा धैर्य जर तुम्ही दाखवू शकलात तर ह्या पत्र प्रपंचा द्वारे एवढीच आशा व्यक्त करतो कि सर्वच सुज्ञांनी मंगला ताई सामंतांच्या विचारांतून काही बोध घ्यावा. [ पत्र लेखक हे महाराष्ट्र पोलिसांतील वर्ग १ चे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.]
On 11/3/2015, one group on twitter named "RSS supporters" sent notification, of enlisting twitter, registered as "Add@Rokhtalk", in their group. Though twitter "Add@rokhtalk" has no doubt about patriotism of members of RSS +, which may be of different type for reason and intentions better known to them, but Twitter “Add@rokhtalk” has been seen, not sparing a single chance to criticize and cut to pieces to, only Brahman’s started and dominated, RSS, BJP, their leaders, followers, principles, pretentions, their boasting and bluffing, juggling nature, double standard mentality, and mostly, about their ancestor’s introduction of heinous, hideous and dirty caste system, in Indian society, where by a group of about 33% of native Indians, recognized as Achhots or Asprushya, meaning Untouchabes, was made free slaves for the rest of all, in its own land, and made to suffer and bear torture, as per punishments, prescribed in, so called Hindu religious books, like M...
Comments
Post a Comment